Valentine Day : एक गाव असंही... जिथे खुलतात प्रेमाचे गुलाब, होतात फक्त प्रेमविवाह!
Chandrapur Village of Love Marriage : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक असं गाव आहे, जे प्रेमविवाहासाठी ओळखले जाते. येथील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील करंजी गावात गेल्या 40 वर्षांपासून 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील याच गावचे रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT
विकास राजुरकर
Chandrapur Village of Love Marriage : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक असं गाव आहे, जे प्रेमविवाहासाठी ओळखले जाते. येथील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील करंजी गावात गेल्या 40 वर्षांपासून 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील याच गावचे रहिवासी आहेत. त्यांनीही प्रेमविवाह (Love Marriage) केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एवढंच नाही तर 11 सदस्यीय ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच अशा सहा सदस्यांनीही प्रेमविवाह केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 40 वर्षांपासून या गावात प्रेमविवाहाची परंपरा सुरू आहे, जी आजतागायत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या गावात तंटामुक्त समिती सक्रिय आहे जी गावात निर्माण होणारे वाद मिटवण्याचे काम करते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या समितीच्या माध्यमातून प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्याला मार्गदर्शन केले जाते. कुटुंबीयांना समजावून सांगितले जाते आणि मुला-मुलीच्या संमतीनंतर गावातील मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत लग्न लावून दिले जाते.
प्रेमविवाहाच्या परंपरेवर गावकरी काय म्हणाले?
अनेक प्रेमविवाह गावात मोठ्या थाटामाटात झाले आहेत, सुरुवातीला या गावात प्रेमविवाहाला विरोध होता पण आता इथली परंपरा झाली आहे. या गावात सर्व धर्माचे लोक राहतात आणि बहुतेक प्रेमविवाह आंतरजातीय असतात. गावात राहणारे प्रदीप खोब्रागडे यांनी सांगितले की, 'ते शिकत असताना शेजारी राहणाऱ्या सुरेखा यांच्या प्रेमात पडले आणि 1997 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नापूर्वी चार वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. आता त्यांच्या लग्नाला 27 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुलं असून ते पत्नीसोबत आनंदी जीवन जगत आहेत.'
ADVERTISEMENT
ग्रामपंचायत सदस्य जानकी तेलकापल्लीवार सांगतात की, '2011 मध्ये तिचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. सध्या ती पती आणि मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे.' तर, एकाच गावातील पोहनकर आणि श्रुती यांचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. दोघांनी एकमेकांना गुपचूप पाहिले आणि प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले. तसंच गावात एक मूकबधिर जोडपं असून, त्यांचाही प्रेमविवाह झाला होता. ते त्यांच्या भावना आणि प्रेम एकमेकांना हातवारे करून व्यक्त करतात. दोघांमध्ये अतूट प्रेम आहे.
ADVERTISEMENT
प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांचीही काढतात समजूत
गावातील तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष तुकेश वानोडे सांगतात की, 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने तंटा मुक्त समिती स्थापन केली, त्या काळात ते या समितीचे अध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक प्रेमविवाह झाले. घरातून पळून जाऊन चुकीचे पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांच्या कुटुंबीयांना समजवून त्यांचे लग्न लावून दिले जाते.
व्हॅलेंटाईन डेला हे गाव देतंय प्रेमाचा संदेश
गावातील समीर निमगडे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचाही प्रेमविवाह झाला आहे. लग्नाला 10 वर्षे झाली असून आज ते सुखी जीवन जगत आहे. आतापर्यंत या गावात कौटुंबिक हिंसाचाराचा एकही गुन्हा पोलिसांत दाखल झालेला नाही. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे संपूर्ण गाव समाजाला प्रेमाचा अनोखा संदेश देत आहे.
ADVERTISEMENT