दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड सलग ११ वर्षे राज्यात अव्वल का येतंय?

मुंबई तक

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्डाने सलग ११ वर्षे राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्डाने सलग ११ वर्षे राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे.

एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.४२ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९९.२० टक्के लागला असून, जिल्हा द्वितीय स्थानी आहे.

गतवर्षी कोकणबोर्डाचा १०० टक्के निकाल लागला होता. पण यावर्षी निकालात ०.७३ टक्के इतकी किंचित घसरण झाली आहे. दरम्यान यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp