तीन गोळ्या आणि तंदूरच्या भट्टीत टाकला मृतदेह, कसं घडलं होतं दिल्लीतील नयना सहानी हत्याकांड?
नव्वदच्या दशकात दिल्लीत अशी एक खळबळजनक घटना घडली होती की ज्यामुळे दिल्ली नाही तर पुर्ण देशच हादरुन गेला होता. मानवी क्रौर्याच्या परिसीमा गाठणारी ही घटना नंतर अनेक दिवस चर्चेचा विषय बनली. दिल्लीतले टिपिकल राजकीय वातावरण, सत्तेची धुंदी, पैसा, प्रेम, सूड, संशय असे अनेक अँगल या घटनेला होते. तेव्हा दिल्लीत घडलेल्य़ा तंदूर हत्याकांडाची घटना नेमकी काय […]
ADVERTISEMENT

नव्वदच्या दशकात दिल्लीत अशी एक खळबळजनक घटना घडली होती की ज्यामुळे दिल्ली नाही तर पुर्ण देशच हादरुन गेला होता. मानवी क्रौर्याच्या परिसीमा गाठणारी ही घटना नंतर अनेक दिवस चर्चेचा विषय बनली. दिल्लीतले टिपिकल राजकीय वातावरण, सत्तेची धुंदी, पैसा, प्रेम, सूड, संशय असे अनेक अँगल या घटनेला होते. तेव्हा दिल्लीत घडलेल्य़ा तंदूर हत्याकांडाची घटना नेमकी काय होती त्याचा आढावा आजच्या लेखात घेऊयात.
दिल्लीच्या टिपीकल राजकीय वातावरणात वाढलेला कॉँग्रेसच्या युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष सुशील शर्मा आणि त्याच्यासोबत काम करणारी कॉँग्रेसची महिला कार्यकर्ता नयना साहनी. दोघंही एकाच संघटनेत काम करत असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झालं. पुढे जाऊन दोघांनीही लग्न केलं. परंतू लग्नानंतर एका जीवलग मित्रावरुन नयना आणि सुशील यांच्यात संशयाचं वातावरण सुरु झालं ज्यातून पुढे अंगावर शहारे आणणारं हत्याकांड घडलं.
लग्नाच्या आधीपासून नयना, सुशील आणि मतलुम करीम या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. परंतू लग्नानंतर सुशील आणि नयनाच्या संसारात संशयाच्या भुताने प्रवेश केला. सुशीलला असा संशय होता की नयना आणि त्याचाच मित्र मतलुम यांच्यात अफेअर सुरु आहे. खरं तर मतलुम हा सुशीलचाही मित्र होता. तो देखील काँग्रेसच्या संघटनेत काम करत होता. परंतू संशयाच्या पिशाच्चाने एकदा तुम्हाला झपाटलं की ते तुमची पाठ सोडत सोडत नाही. या घटनेतही काहीसं असचं झालं.
एक दिवस सुशील शर्मा संध्याकाळी अचानक घरी आला. सुशील घरी आला तेव्हा नयना कोणाशीतरी फोनवर बोलत होती. सुशील अचानक घरी आल्यामुळे नयना थोडीशी दचकली आणि तिने फोन ठेवून दिला. नेहमीप्रमाणे यामुळे परिणाम उलटाच झाला, सुशीलचा संशय अजूनच बळावला. नयना दुसऱ्या खोलीत निघून गेल्यावर सुशीलने त्याच लँडलाईनवरुन नंबर रिडायल केला आणि कॉल लागला तो नेमका मतलुम करीमला.