Shraddha Walkar DNA: मेहरौलीच्या जंगलातील हाडांचे तुकडे श्रद्धाचेच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्ली : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड तपासात दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना मानवी हाडांच्या रुपात मृतदेहाचे काही तुकडे मिळाले होते, ते तुकडे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएशी मॅच झाले आहेत. सीएफएसएलच्या अहवालातून याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.

दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून केलेल्या चौकशीदरम्यान त्याने श्रद्धांच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात फेकून दिल्याचं सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलामध्ये अफताबने नमूद केलेल्या ठिकाणाहून हाडांच्या रूपात मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले होते. यात पोलिसांना मानवी जबड्याचं हाडही सापडलं होतं.

याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हे सर्व तुकडे सीएफएसएल लॅबला पाठवले होते. एवढचं नाही तर डीएनए चाचणीसाठी श्रद्धाच्या वडिलांचंही सॅम्पल घेण्यात आलं होतं. त्याच डीएनए चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून हे हाडांचे तुकडे श्रद्धा वालकरचे असल्याचं आता निष्पन्न झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीतही दिली हत्येची कबुली

यापूर्वी आफताबनं पोलीस चौकशीत आपणच श्रद्धाची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. जे ठेवण्यासाठी त्याने ३०० लिटरचा फ्रीज विकत घेतला होता. आफताब दररोज श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे.

श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. श्रद्धाचा मृतदेह फ्लॅटमध्ये असताना त्याने इतर मुलींनाही तिथं आणलं होतं. हत्येचा संशय कुणालाही येऊ नये म्हणून आफताबने हत्येनंतर काही दिवस श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंटही वापरले होते. आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून काही पैसेही ट्रान्सफर केले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली होती. पॉलीग्राफ चाचणीत आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती. एवढेच नाही तर श्रद्धाच्या मृत्यूनंतर अनेक मुलींशी संबंध असल्याचेही आफताबने कबूल केले होते.

ADVERTISEMENT

आफताबने श्रद्धाला का मारले?

श्रद्धानं आफताबसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिस चौकशीत समोर आलं होतं. आफताबच्या अत्याचारानं ती त्रस्त झाली होती. अशा परिस्थितीत तिनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आफताबला हे आवडले नाही म्हणूनच त्यानं श्रद्धाची हत्या केली. मात्र, आफताबने पोलीस चौकशीत सुरुवातीला सांगितले होते की, श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून १८ मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केलेली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT