25 वर्षांपूर्वी लग्न, 7 मुलं झाली..,नवरा चारित्र्यावर संशय घेऊ लागला, शेवटी भयंकर घडलं!
Bihar Crime News : बिहारच्या नवादा जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची सात मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
25 वर्षांपूर्वी लग्न, 7 मुलं झाली..,
नवरा चारित्र्यावर संशय घेऊ लागला, शेवटी भयंकर घडलं!
Bihar Crime News : बिहारमधील नवादा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. 25 वर्षांपूर्वी ज्या पत्नीचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले होते, त्याच पतीने आज आपल्या पत्नीचा जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना सात मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमोर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नवादा जिल्ह्यातील कौआकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरमा गावात राहणाऱ्या रवी मांझी याने आपली पत्नी बबीता कुमारी हिची चाकूने वार करून हत्या केली. रवी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या पडत होत्या, ज्याचा शेवट अशा दुर्दैवी हत्येत झाला.
विश्वासाची जागा संशयाने घेतली; सात मुलांच्या डोक्यावरून मायचे छत्र हरपले
रवी मांझी आणि बबीता कुमारी यांचा विवाह सुमारे 25 वर्षांपूर्वी झाला होता आणि बबीता ही रूपौ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरेदा गावाची रहिवासी होती. लग्नानंतर त्यांचा संसार फुलला आणि त्यांना सात मुले झाली, मात्र एवढा मोठा परिवार असूनही पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाची जागा संशयाने घेतली होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि अनेकदा बबीतावर विनाकारण संशय घेत असे आणि घरात यावरून दररोज भांडणे होत असत. हा वाद एक दिवस इतका भयानक वळण घेईल आणि हत्येपर्यंत पोहोचेल, अशी कल्पना कुटुंबातील कोणीही केली नव्हती.
हेही वाचा : बायकोचा वाढदिवस साजरा केला अन् गमावला जीव, आईला वेगळाच संशय; अखेर समोर आले 'ते' सत्य
16 वर्षांच्या मुलाने सांगितला थरार; पतीने पत्नीच्या छातीत खुपसला चाकू









