विरह सहन होईना, प्रेयसीला भेटण्यासाठी तिचं गाव गाठलं, पण चोरीचा आरोप करुन लोकांनी इतकं मारलं की जीव गेला
Crime News : पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी गावात गेला होता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच वेळी ग्रामस्थांनी त्याला पकडून ट्रॅक्टरची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तथापि, त्याच्याकडून कोणतीही चोरीची बॅटरी जप्त झालेली नाही. त्यामुळे चोरीच्या आरोपाबाबत संशय निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विरह सहन होईना, प्रेयसीला भेटण्यासाठी तिचं गाव गाठलं,
पण चोरीचा आरोप करुन लोकांनी इतकं मारलं की जीव गेला
Crime News : झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यात जमावाने मारहाण करून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी गावात गेलेल्या तरुणावर चोरीचा संशय घेत ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक रीशमा रामेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी उशिरा रात्री पडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियाही गावात घडली. मृत तरुणाची ओळख मुरमा गावातील पवन राम अशी झाली असून तो त्याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी होता. रात्री सुमारे 12.30 वाजता एका तरुणाला चोरीच्या आरोपावरून गावकऱ्यांनी पकडून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संबंधित तरुणाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी जमावातून त्याची सुटका करून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी गावात गेला होता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच वेळी ग्रामस्थांनी त्याला पकडून ट्रॅक्टरची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तथापि, त्याच्याकडून कोणतीही चोरीची बॅटरी जप्त झालेली नाही. त्यामुळे चोरीच्या आरोपाबाबत संशय निर्माण झाला आहे.










