RPF Constable : “मला कसाबच आठवला”, प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवणारा अनुभव
जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी (31 जुलै) एएसआय आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल चेतनची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT

Jaipur express firing news in Marathi : जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी (31 जुलै) एएसआय आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल चेतनची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रेल्वे गोळीबारातील प्रत्यक्षदर्शींनी गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी काय घडलं, याचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. कॉन्स्टेबल चेतनला गोळीबार करताना बघून मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबची आठवण झाली, असं प्रत्यक्षदर्शींने सांगितलं. (The interrogation of constable Chetan, who shot dead ASI and three passengers on Monday in a train going from Jaipur to Mumbai, is going on)
सांगायचं म्हणजे सोमवारी (31 जुलै) जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला होता. आरोपी हवालदार चेतनने त्याचा वरिष्ठ एएसआय टिकाराम आणि इतर तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने ट्रेनमधून उडी मारली. मात्र, त्याला मिरा रोड येथे अटक करण्यात आली.
ते सगळं भयानक स्वप्नासारखंच होतं -प्रत्यक्षदर्शी
गोळीबाराच्या वेळी ट्रेन अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला हे देखील जयपूर एक्स्प्रेसमध्ये होते. त्यांनी सांगितले की ‘मला कसाबने हल्ला केल्यानंतर जी परिस्थिती झाली होती, त्याचीच आठवण झाली. त्याच्या (चेतन) हातात बंदूक होती आणि तो कसाब सारखंच करत होता. कृष्ण कुमार शुक्ला यांनी सांगितले की, ते 12 वर्षांपासून ट्रेन अटेंडंट आहेत. तो प्रसंग भयानक होता.
वाचा >> RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा
शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार ते ट्रेनच्या B5 बोगीत होते. तेवढ्यात त्यांना गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला तो गोळीचा आवाज आहे असे वाटले नाही. त्यानंतर एएसआय टिकाराम मीना हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तर आरोपी (चेतन सिंग) काही मिनिटे मृतदेहाकडे बघत उभा होता. त्यानंतर सर्व प्रवासी घाबरले. त्यानंतर प्रवाशांनी B5 बोगी बंद केली, जेणेकरून कोणीही त्यात प्रवेश करू नये आणि कोणी बाहेर जाऊ नये.