2 साडू अन् पत्नीचं अफेअर, पतीला विष देऊन संपवण्याचा प्लॅन अन्...शेवटी काय घडलं?

मुंबई तक

UP Crime News : हरदोईमध्ये लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत पत्नीने जेवणातून विष देऊन पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

2 साडू अन् पत्नीचं अफेअर

point

पतीला विष देऊन संपवण्याचा प्लॅन अन्...शेवटी काय घडलं?

UP Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिलग्राम कोतवाली हद्दीत लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत एका नवविवाहित महिलेवर पतीला जेवणातून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित पतीने स्वतः पत्नीविरोधात अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळून आपली हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी विवाहबाह्य संबंध असल्याचा दावाही त्याने केला आहे. या तिघांनी संगनमताने आपल्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप पीडिताने केला असून, पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानंतर घटनेच्या 21 दिवसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : माजी सरपंच महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, शेवटी गोठ्यात केला मर्डर

पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी विवाहबाह्य संबंध, शेवटी भयानक कट 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांधामऊ येथील 28 वर्षीय संगम कुमार यांचा विवाह 24 नोव्हेंबर 2025 रोजी कानपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. संगम कुमार यांनी आरोप केला आहे की, लग्नापूर्वीपासूनच त्यांच्या पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी म्हणजेच मनोज कुमार आणि उमाशंकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. या संदर्भात त्यांनी पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. पत्नी त्या दोघांबाबत कोणतेही बोलणे ऐकून घेण्यास तयार नव्हती, असा दावाही पीडिताने आपल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा : बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली