Lok Sabha Election : मविआमध्ये पहिलं बंड! ठाकरेंची वाढली कटकट, भाजपला होणार फायदा?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
social share
google news

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप केलं. तिन्ही पक्षाचे नेते प्रचारातही गुंतले आहेत. पण, ठाकरेंची कटकट वाढता दिसत आहे. या डोकेदुखीचं कारण ठरली आहे सांगलीची जागा. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पहिलं बंड सांगलीत झालं आहे. पण, यामुळे भाजपची लढाई सोपी होणार आहे, असे म्हटले जात आहे. (Sangli Lok Sabha Election Explained)

"विशाल पाटील यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म भरलेला नाही. पण, एबी फॉर्म शेवटच्या क्षणीही दिला जाऊ शकतो. त्यामुळे 19 एप्रिलपर्यंत तीन वाजेपर्यंत मुदत आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाकडून आणि एक अपक्ष म्हणून", अशी माहिती काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिली. 

विश्चजीत कदम सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी या जागेसाठी मुंबई आणि दिल्लीच्याही वाऱ्या केल्या. पण, ठाकरेंनी जागावाटपाच्या जाहीर होण्याआधीच उमेदवार घोषित केल्याने सांगलीतील काँग्रेस नाराज आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सांगलीत मविआच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात सांगलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. पण, या बैठकीकडे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील आपली नाराजी लपवू शकले नाही. 

"माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी माघार घेण्यास तयार आहे. पण, शेतकर्‍याचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावे", असे चंद्रहार पाटील म्हणाले. 

ADVERTISEMENT

वसंतदादांचे नातू रिंगणात

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी विशाल पाटील सुरुवातीपासून करत आहेत. पण, ही जागा शिवसेनेने घेतल्याने आता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याचा थेट फटका ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटलांना बसू शकतो.

ADVERTISEMENT

विशाल पाटील हे रिंगणात असतील, तर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा मतदार ठाकरेंच्या पारड्यात मते टाकण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचीही सगळी मते चंद्रहार पाटलांना पडतील याबद्दलही शंका उपस्थित होताहेत.

दुसरीकडे सांगली जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद फार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळेल आणि सांगलीतील लोकसभेची लढाई सोपी जाईल, अशा विचारातून ठाकरेंनी उमेदवार उतरवला पण आता त्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजपला होऊ शकतो फायदा?

विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही, तर सांगली जिल्ह्यात तिरंगी लढत होताना दिसेल. भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेनेचे (युबीटी) चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी लढत असेल. यात महाविकास आघाडीची मते विभागली जाईल आणि याचा थेट फायदा भाजपचे संजयकाका पाटील यांना होईल. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला पराभवाचाही सामना करावा लागू शकतो.

काँग्रेसकडून मनधरणीचे प्रयत्न

मविआच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, विशाल पाटील माघार घेण्याची शक्यता कमी दिसत आहेत. उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी "आयुष्याची  प्रत्येक परीक्षा आईच्या आशिर्वादाने दिली. असंख्य आव्हानांना तोंड देत आज पुन्हा एका परीक्षेला सामोरा जात आहे. स्वाभिमानाच्या या लढाईत मी नक्की यशस्वी होईन याचा मला विश्वास आहे कारण सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची साथ आहे", असे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सांगलीतील राजकीय स्थिती रंगतदावर अवस्थेत पोहोचली आहे.  

2019 मध्ये काय झालं होतं?

गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये सांगली लोकसभा निवडणुकीवेळी आघाडीने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली होती. त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. 

भाजपचे संजयकाका पाटील यांना या निवडणुकीत 5 लाख 8 हजार 995 मते मिळाली होती, तर विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तब्बल 3 लाख 234 मते घेतली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT