Lok Sabha Election 2024: 'BJP चे आमदार जास्त तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री..', 'यासाठी' मोदींनी शिंदेंना बनवलं CM!

मुंबई तक

ADVERTISEMENT

'यासाठी' मोदींनी शिंदेंना बनवलं CM!
'यासाठी' मोदींनी शिंदेंना बनवलं CM!
social share
google news

Why PM Modi Made CM to Eknath Shinde: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने भाजपसाठी महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आहे. अशावेळी स्वत: पंतप्रधान मोदी येथील राजकारणात जातीने लक्ष देत आहे. महाराष्ट्रात आजवर कधीही उद्भवली नव्हती अशी राजकीय परिस्थिती ही लोकसभा निवडणुकीत आहे. अशावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 bjp has maximum number of mla but shiv sena still has chief minister this is my tribute to balasaheb thackeray said narendra modi)

'आमच्याकडे आज सर्वात जास्त आमदार आहेत पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे..' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागची काय भूमिका होती हे स्पष्ट केलं. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आहे. 

'यासाठी' एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी बनवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री?

मुलाखतीत पंतप्रधान मोदींना असा प्रश्न विचारण्यात आला की, 'बाळासाहेब ठाकरे आणि तुमचे संबंध हे चांगले होते. तुम्ही त्यांचा सन्मानही करायचा.. ते तुमच्या बाजूने उभेही राहायचे.. आता आपण वारसाबाबत बोललात.. त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी मानतात की नाही?'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय..: मोदी

पंतप्रधान मोदी: जिथवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मुद्दा आहे तर मी त्यासाठीच जगेन.. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही. 

आज जे आम्ही शिवसेनेसोबत बसलो आहोत.. आमच्याकडे आज सर्वात जास्त आमदार आहेत पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे.. 

आम्ही मागील निवडणुकीत (2014 साली) आमनेसामने लढलो होतो. पण त्या निवडणुकीत मी एक शब्दही बाळासाहेबांच्या विरुद्ध बोललो नव्हतो. मी जाहीररित्या बोललो होतो की, मला उद्धवजी कितीही शिव्या देवोत.. पण नाही बोलणार, कारण माझं बाळासाहेबांवर माझी श्रद्धा आहे. म्हणून त्यांच्या कौटुंबिक काय अडचणी आहेत हा माझा विषय नाही.. 

ADVERTISEMENT

मी बाळासाहेबांचा आदर करतो आणि मी त्यांचा आयुष्यभर आदर करत राहो.. असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

ADVERTISEMENT

PM मोदींनी देवेंद्र फडणवीसांऐवजी शिंदेंच्या हाती सोपवलेलं राज्य

ठाकरे सरकारमध्ये बंड करून 40 आमदारांसोबत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करून थेट राज्याचं मुख्यमंत्री पद मिळवलं. पण या घडामोडी अत्यंत नाट्यमय होत्या.

हे ही वाचा>> 'शिंदेंचं-ठाकरेंसोबत साटंलोटं, मुलासाठी ठाणे...', BJP पदाधिकाऱ्याचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला काही शिवेसना आमदारांसोबत सूरत गाठत पक्षात बंड केलं. त्यानंतर त्यांनी गुवाहटी गाठलं.. ज्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार जाऊन हे शिंदेंना भेटले.. जवळजवळ 40 आमदार हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे हे स्पष्ट झालं की, ठाकरेंचं सरकार हे अल्पमतात आलंय आणि ते कोसळणार. 

या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे स्पष्ट झालं की, राज्यात भाजपचं सरकार अस्तित्वात येणार. कारण भाजपकडे स्वत:चे 105 आमदार होते. तसंच काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा होता. 

त्यावेळी अनेकांनी असाच अंदाज वर्तवला होता की, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. पण अगदी शेवटच्या क्षणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एक धक्का देणारा निर्णय घेतला. तो म्हणजे फडणवीस यांच्याऐवजी 40 आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचं.. 

मात्र, हा निर्णय म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली होती असं पंतप्रधान मोदींनी आता म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT