Mumbai Voting: 'अधिकाऱ्यांना खोलीतून सोडू नका, पहाटेचे 5 वाजले तरी...', ठाकरे प्रचंड संतापले!

मुंबई तक

Lok Sabha Election 2024: मुंबईत अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान होत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Udddhav Thackeray Mumbai Voting: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या फेरीतील मतदान आज (20 मे) पार पडत आहे. पण मतदानादरम्यानच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपवर तुफान टीका केली आहे. (lok sabha election 2024 due to the slow voting process in mumbai uddhav thackeray made serious allegations against election commission and bjp)

मुंबईतील अनेक भागांमधील मतदारसंघांमध्ये मागील काही तासांपासून प्रचंड धीम्या गतीने मतदान सुरू आहे. त्यामुळे बराच मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला हा प्रकार काही मतदान केंद्राबाबतच समोर आल होता. मात्र, थोड्याच वेळात मुंबईतील अनेक मतदार केंद्रांवर अशाच स्वरूपाच्या रांगा लागल्या असल्याचं समोर आलं.

हे ही वाचा>> ''बिल्डरपुत्राला जामीनासाठी रेड कार्पेट, पोलिस ठाण्यात बिर्याणी, पिझ्झा पार्टी...'',

त्यानंतर या घटनेचं गांभीर्य ओळखून उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब हे बाहेर पडलं आणि त्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन मतदार केंद्राची पाहाणी केली. एवढंच नव्हे तर तेथील मतदानाचा वेग वाढविण्यात यावा यासाठी प्रयत्नही केली. 

यानंतर उद्दव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेत या सगळ्या घटनेवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. तसंच या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. पण याचवेळी त्यांनी मतदारांना आवाहनही केलं की, कितीही उशीर झाला तरी रांग सोडू नका. 

हे वाचलं का?

    follow whatsapp