Thane: 'मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून शिंदेंनी ठाकरेंसोबत..', BJP पदाधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ
Bjp Vs Shiv Sena: मुलासाठी शिंदेंनी ठाकरेसोबत साटंलोटं केलं आहे.. त्यामुळेच त्यांनी नरेश म्हस्के सारखा उमदेवार ठाणे मतदारसंघात दिला आहे. असा गंभीर आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्याने केला आहे.
ADVERTISEMENT

Thane Lok Sabha Election 2024: नवी मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. त्यातही सर्वांच लक्ष हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. अखेर काल (1 मे) शिवसेनेने येथे नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर केलं. पण त्यामुळे ठाणे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट शिंदे-ठाकरेंमध्ये 'डील' झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. (lok sabha election 2024 reconciled in a eknath shinde and uddhav thackeray shinde made a deal in thane constituency for a son bjp office bearer allegation stirs up excitement)
ठाणे मतदारसंघ हा भाजपला सुटेल असा येथील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा होरा होता. त्यासाठी भाजपमधील दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हे तयारीला लागले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्याने संजीव नाईक यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं.
हे ही वाचा>> 'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय X% मारली?', राणेंचा तोल सुटला!
यामुळेच नवी मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यंत्र्यांवर गंभीर आरोप केले. 'शिंदें यांनी आपल्या मुलासाठी आणि ठाकरेंसोबत साटंलोटं केलं.' असा आरोप त्यांनी यावेळी केला. याशिवाय नवी मुंबईतील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्केंना तिकीट दिल्याच्या विरोधात आपले राजीनामे दिले आहेत.
'शिंदे-ठाकरेंचं साटंलोटं...', भाजपचे पदाधिकारी शिवसेनेवर संतापले
नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या भावना व्यक्त करताना असं म्हटलं की, '65 नगरसेवक हे 2019 साली गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी देखील विधानसभेच्या वेळेस संजीव नाईक यांनी दहा वर्ष नेतृत्व केलं. तिसरं टर्म असताना देखील त्यांना डावलण्यात आलं आहे. पण संजीव नाईक यांनी मनाचा मोठेपणा दाखवून गणेश नाईक साहेबांना जागा दिली.'