Lok Sabha Election 2024: भाजपला 400 जागा का हव्यात आहेत?, भाजप नेते म्हणतात...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024: भाजपला 400 जागा का हव्यात आहेत?, ही आहेत कारणं
Lok Sabha Election 2024: भाजपला 400 जागा का हव्यात आहेत?, ही आहेत कारणं
social share
google news

BJP 400 Seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मधील चार टप्प्यातील मतदान हे पूर्ण झालं असून देशात आता फक्त तीन टप्पे बाकी आहेत. अशावेळी राजकीय पक्षांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याच्या मोहिमेला भाजप नेत्यांनी वेग दिला आहे. तथापि, या आकड्यामागील कारणाबद्दल मात्र भिन्न मतं असल्याचं दिसून येतंय. (lok sabha election 2024 why bjp wants 400 seats these are the reasons)

काशी आणि मथुरेच्या भव्य मंदिरांसाठी हव्यात 400 जागा...

मंगळवारी हिमंता बिस्वा सरमा यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्यासाठी लक्ष्मी नगर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. तेव्हा ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत भाजप जेव्हा 400 चा आकडा पार करेल, तेव्हा मथुरेत कृष्णाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.'

समान नागरी संहितेसाठी...

यापूर्वी 11 मे रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांच्या समर्थनार्थ बिहारच्या बेगुसराय येथे रॅली काढली होती तेव्हा ते म्हणालेले की, संपूर्ण देशात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याची आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थानी अत्याधुनिक मंदिर बांधण्यासाठी एनडीएला लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकाव्या लागतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाबरी मशिदीची पुनर्बांधणी होऊ नये यासाठी...

9 मे रोजी आसामचे हिमंता बिस्वा सरमा यांनी मलकानगिरी, ओडिशात एका सभेला संबोधित केले आणि म्हणाले, भाजप 400 जागांची मागणी करत आहे कारण काँग्रेस अयोध्येत राम मंदिराच्या जागी बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करू शकते. पण बाबरी मशीद भारतात कधीही पुन्हा बांधली जाणार नाही याची मतदारांनी खात्री केली पाहिजे. त्यामुळे आम्हाला, पंतप्रधान मोदींना 400 हून अधिक जागा देऊन त्यांना पंतप्रधान करावे लागेल.

हे ही वाचा>> मुंबईत PM मोदींचा रोड शो; मेट्रोसेवा किती वेळ राहणार बंद?

हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभेच्या 400 जागांसाठी केलेले आवाहन ही काही नवीन गोष्ट नाही. याआधी पीएम मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी 400 जागांची गरज असल्याचे म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

काय म्हणालेले पीएम मोदी...

7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापित करण्यासाठी काँग्रेसला लोकसभेत 400 हून अधिक जागा जिंकण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, 'भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या 400 जागा काँग्रेसला अयोध्येतील राम मंदिरावर 'बाबरी लॉक' लावण्यापासून रोखतील.'

ADVERTISEMENT

संविधान दुरुस्तीसाठी...

एप्रिलमध्ये समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये भाजपचे मेरठचे उमेदवार अरुण गोविल संभाव्य घटनादुरुस्तीबद्दल बोलताना दिसलेले. सरकारला काही मोठे करायचे आहे म्हणून 400 ओलांडण्याचा नारा दिला आहे का, असे विचारले असता? यावर गोविल म्हणालेले, 'मला असे वाटते कारण मोदीजी असे काही बोलत नाहीत, त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे. जेव्हा आपल्या देशाची राज्यघटना बनवली गेली तेव्हा त्यात परिस्थितीनुसार हळूहळू बदल होत गेले. बदल करणे हे प्रगतीचे लक्षण आहे, त्यात वाईट असे काहीच नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. संविधान कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने बदलत नाही, एकमत असेल तेव्हाच बदलते, असे काही घडले तर ते केले जाईल.'

हे ही वाचा>> '...तेव्हा नकली शिवसेना तोंडावर कुलूप लावते', PM मोदी ठाकरेंवर बरसले!

याआधी भाजपचे विद्यमान खासदार आणि अयोध्येतील उमेदवार लल्लू सिंह यांनी मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेत सांगितले होते की, 'नवीन संविधान बनवण्यासाठी सरकारला संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. 272 खासदारांसह सरकार बनवता येऊ शकते, असे सांगताना लल्लू सिंह यांच्या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये असं ऐकू येत आहे की, 'संविधानात सुधारणा करण्यासाठी किंवा नवीन संविधान बनवण्यासाठी आम्हाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत हवे आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नागौर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्योती मिर्धा सोशल मीडियावर एक कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर वादात सापडल्या होत्या. या व्हिडिओमध्ये त्या घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपला बहुमत मिळवून देण्याबाबत बोलत होत्या.

मार्चमध्ये, लोकसभा निवडणुकीच्या आधी, कर्नाटकातील भाजपचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, मतदारांनी घटनादुरुस्तीसाठी लोकसभेत भाजपला दोन तृतीयांश बहुमत द्यावे. मात्र, भाजपने हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं होतं.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT