Uddhav Thackeray : "...त्यावेळी हुकुमशाहाचा अंत होतो", ठाकरेंचा थेट मोदींवर 'वार'

ADVERTISEMENT

मोदींना हुकुमशहा म्हणत उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावरून टीका.
मोदींना हुकुमशहा म्हणत उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावरून टीका.
social share
google news

Uddhav Thackeray PM Narendra Modi : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वार केला. भाजप हा फुगा होता, आम्ही त्याच्यात हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असे म्हणत ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केले. 

उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण

ठाकरे म्हणाले, "भाजप हा एक फुगा आहे. आणि मला वाईट एका गोष्टीचे वाटत की, या फुग्यात हवा भरण्याचे काम आम्हीच केले होते. संपूर्ण देशात यांचे दोन खासदार होते. या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली आहे. काय त्यांची स्वप्ने?" 

"मला सुद्धा विचारतात की, तुमच्या किती सीट येतील. त्यांना (भाजप) विचारल्यावर ते म्हणतात, ४०० पार. काय फर्निचरचे दुकान आहे का? खुर्च्या बनवताहेत... चारशे पार म्हणजे काय फर्निचरचे दुकान आहे का? पण, ही लढाई... आज देशभरातून महत्त्वाचे नेते इथे आले आहेत." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही हुकुमशाहाच्या विरोधात -ठाकरे

"ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाहीये. कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सारखीच आहे. ज्यावेळी इंडिया आघाडीची बैठक घेतली. त्यावेळी मोदींनी सांगितले होते की ही विरोधी पक्षाची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही हुकुमशाहाच्या विरोधात आहोत." 

"मोदीजी, जेव्हा तुम्ही आमच्या घराणेशाहीवर आरोप करता, तेव्हा तुमचं घराण... मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही. पण, तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? आणि ही जी लढाई आपण लढतोय ती लोकशाही वाचवण्याची. संविधान वाचवण्याची आहे." 

ADVERTISEMENT

त्यासाठीच यांना चारशे पार हवेत, ठाकरेंनी काय सांगितलं?

"शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे की संविधानाची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टामध्ये जेव्हा एखादा माणूस साक्ष द्यायला येतो. जो येतो तो त्याच्या धर्म ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतो. ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या, हे त्या घटनेंचं महत्व आहे. आणि यांना चारशे पार आता त्यांच्यासाठी पाहिजे." 

ADVERTISEMENT

"त्यांचेच एक मंत्री आहेत. अनंतकुमार हेगडे, तेच बोललेत की, आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचे आहेत. काल मी एक बातमी वाचली... रशियात निवडणुका चालल्यात... पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहेत? कुणीच नाहीये. कारण जे विरोधक होते, ते तुरुंगात आहेत. आणि बहुतांश त्यांनी देशाबाहेर तडीपार करून टाकले आहेत. लढायलाच कुणी नाहीत. दाखवतात कसे की बाबा मी लोकशाही मानतो. बघा मी निवडणूक घेतली. समोर कुणी उभाच नाही, तर मी काय करू?"

देशाची ओळख व्यक्ती होता कामा नये; ठाकरेंचा इशारा

"आपल्यासमोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे. जे मी नेहमी सांगतो की, देश हाच माझा धर्म. देश वाचला, तर आम्ही वाचू. आपली ओळख, व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे. देशाची ओळख कुणी व्यक्ती होता कामा नये. कुणी कितीही मोठा असला तरी त्याच्या पेक्षा मोठा माझा देश आहे." 

"आता जाहिरात करतात मोदी सरकार... मग तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचे स्वप्न आहे. असं काही वेळेला वाटत होतं की देशात मजबूत सरकार पाहिजे. पण, आता आपल्या अनुभवाने कळलं आहे. अटलजींचं सरकार होतं. त्यात आपण सगळे होतो. अटलजींनी उत्तम प्रकारे चालवलं होतं." 

"२०१४ पासून एका पक्षाचे सरकार आहे. आता ते सांगताहेत की, विरोधक २०२९ मध्ये अडकलाय, पण मी २०४७ ची गोष्ट करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकुमशहा कितीही मोठा असला, तरी ज्या वेळी सगळे लोक एकवटतात, त्यावेळी हुकुमशाहाचा अंत होतो. आजच वेळ आलेली आहे." 

"हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. जो आपल्यामध्ये फूट पाडतोय, त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छातावर राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. तेजस्वीजी तुम्ही जसा नारा दिला आहे, तसा नारा मी पण देतोय. ते म्हणताहेत अब की बार... मी म्हणतोय अब की बार भाजपा हद्दपार. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे." 

"शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं. हातामध्ये मशाल घेऊन महाराष्ट्रात आपल्या रणशिंग फुकायचं आहे. आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते, तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालतो. म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची लढाई सुरू होतेय."

"मी त्या हुकुमशाहांना सांगतोय की, तु्म्हाला असं वाटत असेल, ज्यांना ज्यांना घाबरवून तुम्ही तुमच्या पक्षात घेताहेत. ते म्हणजे जनता नाही. देशाची जनता आमच्यासोबत आहे. तुम्हीही कितीही अत्याचार करा आम्ही तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT