BJP Lok Sabha Election : भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं

भागवत हिरेकर

BJP Candidate lok Sabha election : भाजपने महाराष्ट्रातील २३ पैकी ७ खासदारांना डच्चू दिला आहे. त्यांच्या जागेवर नवीन चेहरे देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्रातील ७ विद्ममान खासदारांची भाजपने तिकिटे कापली आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने महाराष्ट्रातील सात खासदारांना डच्चू

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा निर्णय

point

प्रमोद महाजन यांच्या मुलीलाही नाकारले तिकीट

Maharashtra Lok Sabha election 2024 : 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार जिंकून आले होते. त्यातील काही 2014 मध्येही निवडून आले होते, पण हॅटट्रिकची संधी असणाऱ्या काही खासदारांची तिकिटं कापली. महाराष्ट्रातील सात विद्यमान खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली असून, त्याबद्दलच्या कारणाची चर्चा जोरात सुरू आहे. (BJP Cuts Tickets of Seven MPs from Maharashtra)

लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी त्यात अनेक विद्यमान खासदारांची नावे नव्हती. त्यातून हे स्पष्ट झाला की, भाजपकडून अनेक ठिकाणी उमेदवार बदलले जाणार आणि झालेही तसेच. भाजपने 23 विद्ममान खासदारांपैकी 7 जणांचे तिकीट कापले. 

मुंबईतील तिन्ही खासदारांना धक्का

2014 पासून उत्तर मुंबईचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या गोपाल शेट्टी यांना यावेळी धक्का बसला. पक्षाने त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्याबद्दल पक्षातंर्गत नाराजी होती, अशी माहिती आहे.

हेही वाचा >> "तुम्ही कितीही थापा मारल्या तरी...", भाजपचा ठाकरेंवर पलटवार 

ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना भाजपने यावेळी तिकीट दिले आहे. मिहीर कोटेच्या यांच्याविरोधात पक्षातील काहींची नाराजी आणि मतदारसंघात जनसंपर्क नसणे, ही तिकीट कापण्याची कारणे सांगितली जात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp