27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजपा फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर...', सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई तक

राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला. मुंबईसह बहुसंख्य महापालिकांवर भाजपाने सत्ता मिळवली. आता या निकालानंतर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महापालिका निवडणुकांनंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

point

ट्विट करत दिली प्रतिक्रिया

Sushma Andhare Post: राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला. मुंबईसह बहुसंख्य महापालिकांवर भाजपाने सत्ता मिळवली. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत भाजप महायुती बहुमत मिळवले. तसेच, गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजपने उलथवून लावली. आता या निकालानंतर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी 

"गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाहीं..!!
कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त 4 ...!!!

शिवसेना UBT चे 20/25 नगरसेवक होते. आज 65 आहेत. 

मनसेचे 6 नगरसेवक हा फायदा वेगळाच!