Amitabh: अभिव्यक्तीवर पहिल्यांदाच बोलले बिग बी, कोणाच्या वर्मी बसला वार?

मुंबई तक

Amitabh Bachchan Statement on Freedom of speech कोलकाता: ‘देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. पण आजही नागरिकांचं स्वातंत्र्य आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या याच विधानानं देशभर खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल (Freedom of speech) बोलत आले आहेत. (amitabh […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Amitabh Bachchan Statement on Freedom of speech कोलकाता: ‘देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. पण आजही नागरिकांचं स्वातंत्र्य आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या याच विधानानं देशभर खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल (Freedom of speech) बोलत आले आहेत. (amitabh bachchan gave such a statement on freedom of expression in bengal bjp attack on mamata banerjee)

मात्र, आतापर्यंत कोणत्याही वादात न पडणाऱ्या बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी आता स्वातंत्र्याबाबत उल्लेख केल्यानं देशभर त्याची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी (15 डिसेंबर) कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये अमिताभ बच्चन यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. खरं तर आपल्या भाषणात अमिताभ यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा नेमका रोख कोणाकडे आणि त्यांनी कोणाला सुनावलंय वरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर याच कार्यक्रमात बोलताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, ‘असं बोलायला हिंमत लागते’, असं म्हणत त्यांन अमिताभ बच्चन यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान

हे वाचलं का?

    follow whatsapp