विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा एकदा खालावली : डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. काल गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषध सुरु करण्यात आली आहेत. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर आहेत. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सकाळी मेडिकल बुलेटिन जारी करुन ही माहिती दिली. उद्या सकाळी ११ वाजता पुढचे बुलेटिन जारी केले जाईल, असंही शिरीष याडगिकर यांनी सांगितलं.

काल जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये विक्रम गोखलेंची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं सांगण्यात आलं होतं. ते आता डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत आहेत. त्यांचं ब्लड प्रेशर आणि हार्ट स्टेबल आहे. यासह पुढील 48 तासात व्हेंटिलेटर देखील काढलं जाऊ शकतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यामुळे कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा मिळाला होता.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्यामुळे बुधवारी त्यांना पुण्यातली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील बोललं जात होतं. गेल्या चोवीस तासात ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत अशी महत्त्वाची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे डॉक्टर शिरीष याडगिकर यांनी गुरुवारी दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र, शुक्रवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार किंचित का होईना त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसंच ते डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत असल्याची महत्वाची सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास

विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास आहे. तसंच त्यांना जलोदर झाला आहे. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम गोखले यांनी अनेक नाटकांमधून, सिनेमांतून आणि सीरियल्समधून कामं केली आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकांमधल्या अभिनयातून संन्यास घेतला होता.

ADVERTISEMENT

मात्र सिनेमांमध्ये त्यांनी काम करणं सुरू ठेवलं आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या गोदावरी या सिनेमात नारोशंकर देशमुख ही भूमिका त्यांनी साकारली आहे. मारूतीच्या पायाला पाणी लागलं का? हा त्यांचा एकमेव डायलॉग सिनेमात आहे मात्र त्यांनी स्मरणात राहणारी भूमिका साकारली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT