कभी कभी,चांदनी,सिलसिला या सुपरहिट सिनेमांचे लेखक सागर सरहदी यांचं निधन

मुंबई तक

कभी कभी,चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक सागर सरहदी यांचं रविवारी रात्री मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. सागर सरहदी हे ‘कभी कभी’, चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कभी कभी,चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक सागर सरहदी यांचं रविवारी रात्री मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

सागर सरहदी हे ‘कभी कभी’, चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जायचे. सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ मध्ये पाकिस्तानात झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत आले. दिल्लीत काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर संघर्ष करत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp