PM Modi Yavatmal : मोदी यवतमाळमध्ये पण, चर्चा 2014 मध्ये दिलेल्या गॅरंटीची!

भागवत हिरेकर

PM Modi Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीचे गावकरी मोदींना का करून देताहेत जुन्या घोषणांची आठवण?

ADVERTISEMENT

what has modi promised to farmers in 2014
मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा २०२४ चा रणसंग्राम

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा यवतमाळमध्ये

point

मोदींनी २०१४ मध्ये काय दिली होती आश्वासने?

PM Modi Yavatmal Visit : 2014, 2019 आणि आता 2024... 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू केलेल्या पायंडा मोदींनी यावेळीही कायम ठेवला. लवकरच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, त्यापूर्वीच मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर आलेत. मोदींच्या या दौऱ्यानिमित्त चर्चा सुरू झालीये ती 2014 मध्ये त्यांनी दिलेल्या गॅरंटीची! १० वर्षांपूर्वी मोदींनी यवतमाळमधील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना काय हमी दिली होती, त्या गॅरंटीचं काय झालं,  हेच समूजन घेऊयात... 

"आठवणीतील चाय पे चर्चा... मा. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? कापसावर आधारित उद्योग आणणार होते, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार होते, पुढे काय झालं? काळंधन वापस आणणार होते, आम्हाला काहीच समजलं नाही? विनीत समस्त गावकरी मंडळी, दाभडी."

हे वाचून तुम्ही म्हणाल हे काय आहे. हे शब्द आहेत एका बॅनरवरील. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात असलेल्या दाभडी गावात हा बॅनर लावण्यात आला आहे. दाभडी गावातील ग्रामस्थांनी या बॅनरमधून पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिलीये. दहा वर्षापूर्वी मोदींनी दाभडीतील शेतकऱ्यांना काय हमी दिली होती. हे जाणून घेण्याआधी मोदी आणि यवतमाळच्या कनेक्शनबद्दल जाणून घेऊयात...

मोदी आणि यवतमाळ

28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करण्याची मोदींची ही तिसरी वेळ आहे. 2014 मध्ये भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली. त्यानंतर मोदींनी चाय पे चर्चा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात घेतला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp