मुंबईकरांनो, 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मोबाईल तासनतास वापरल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जात आहे.
ADVERTISEMENT

Side Effects of Using Mobile : आजच्या काळात मोबाईल हा लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कुणाशी तरी बोलणे, ऑफिसचे मेल तपासणे, जेवणाची ऑर्डर देणे किंवा काही वस्तूंची ऑर्डर देणे या सर्व गोष्टी केवळ मोबाईलच्या मदतीने करता येतात. मोबाईल वापरून तुम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड राहता, पण कुठेतरी यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मोबाईल तासनतास वापरल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जात आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत मुंबईत एक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात सहभागी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जे लोक दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरतात, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी हे उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…
मुंबईत राहणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल ही लोकांची सर्वात मोठी गरज बनल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहेत हे लोकांना जाणून घेणे फार महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया मोबाईल फोनच्या वापरामुळे कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
डोळ्यांवर होऊ शकतात गंभीर परिणाम
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर दबाव येतो. काहीवेळा आपल्याला ते जाणवत नाही, परंतु ते आपल्या डोळ्यांना देखील नुकसान पोहोचवू शकते. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.