लखीमपूर हिंसाचार : हा हिंसाचार पाहूनही शांत राहणारी लोकं आधीच मेलेली आहेत – राहुल गांधी
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या भागात बंदोबस्तात वाढ केलेली असली तरीही काँग्रेससह सर्वच प्रमुख विरोधी पक्ष यानिमीत्ताने उत्तर प्रदेश सरकारवर तुटून पडले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत, हा नरसंहार पाहिल्यानंतरही […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या भागात बंदोबस्तात वाढ केलेली असली तरीही काँग्रेससह सर्वच प्रमुख विरोधी पक्ष यानिमीत्ताने उत्तर प्रदेश सरकारवर तुटून पडले आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत, हा नरसंहार पाहिल्यानंतरही जी लोकं शांत आहेत ते आधीच मेलेले आहेत. परंतू आम्ही शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
जो इस अमानवीय नरसंहार को देखकर भी चुप है, वो पहले ही मर चुका है।
लेकिन हम इस बलिदान को बेकार नहीं होने देंगे- किसान सत्याग्रह ज़िंदाबाद!#FarmersProtest pic.twitter.com/z1NRlGJ8hq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2021
दरम्यान काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधीदेखील लखनऊमध्ये दाखल झाल्याअसून त्या सोमवारी लखीमपूर खेरीमध्ये जाणार आहेत.
Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra arrives in Lucknow.
She will be visiting Lakhimpur Kheri tomorrow.
(File photo) pic.twitter.com/MYZfDNJGGE
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2021
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत, किसान एकता मोर्चा, अखिलेश यादव यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी राज्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर भाजपचे नेते ना गाडीतून फिरु शकतील ना गाडीतून खाली उतरू शकतली असा इशारा दिला आहे. तसेच अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.