पंचनामे होत राहतील आधी शेतकऱ्यांना मदत करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई तक

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत राहतील आधी त्यांना मदत करणं जास्त गरजेचं तातडीचा दिलासा द्या, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होतील असंही फडणवीस म्हणाले. भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत राहतील आधी त्यांना मदत करणं जास्त गरजेचं तातडीचा दिलासा द्या, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होतील असंही फडणवीस म्हणाले. भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. काही भागात तर संपूर्ण पिकांचं उद्धवस्त झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला. तरी सुद्धा शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांचा नापिकीच्या प्रश्न उचलून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याच सांगितलं. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन आणि कापसाची झाड दाखवून देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधून घेतलं.

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp