वारसा! विचारांचा बरं का फक्त रक्ताचा नाही…
‘राजनीती’ हा शब्द “राज” आणि “नीती” या दोन शब्दांनी तयार झाला असला तरी राजनीती’ हा शब्द असा एकत्र करून उच्चारला तरी प्रतिसाद 99.99 टक्के हा नकारात्मक आणि निरूत्साही असतोच. I don’t know politics, I don’t follow …. असं म्हणून किमान नम्रतेने बोलणारे कमी का होईना आढळतातच..’राज’ (जवाबदारी) ‘नीती’ ने करण्यासाठी असते आणि म्हणून शब्द राजनीती […]
ADVERTISEMENT

‘राजनीती’ हा शब्द “राज” आणि “नीती” या दोन शब्दांनी तयार झाला असला तरी राजनीती’ हा शब्द असा एकत्र करून उच्चारला तरी प्रतिसाद 99.99 टक्के हा नकारात्मक आणि निरूत्साही असतोच. I don’t know politics, I don’t follow …. असं म्हणून किमान नम्रतेने बोलणारे कमी का होईना आढळतातच..’राज’ (जवाबदारी) ‘नीती’ ने करण्यासाठी असते आणि म्हणून शब्द राजनीती आहे, पण काही दशकांत आम्ही राजकारण्यांनी त्याचा अर्थ बदलला आहे.
सोशल मीडियाचा प्रादुर्भाव हा प्रभावापेक्षा जास्त झाला आहे. मीडियाचा उपयोग आपल्या दूरच्या माणसांना जवळ आणण्यात नक्की झाला, परंतू सोशल मीडियाचा उपयोग माणुसकीला माणसांपासून दूर नेण्यात करण्यात आला हे मात्र सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. राजकारणात तर या आयुधांची अस्त्र झाली आहेत, यात बदल होणं अपरिहार्य असलं तरी कठीण आहे.