मुंबईत लॉकडाऊन वाढणार का?, पाहा काय आहे मुंबई महापालिका आयुक्तांचं उत्तर!
मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. अशावेळी मुंबईतील लॉकडाऊन (Mumbai Lockdown) शिथील होणार का? असा प्रश्न अनेक जण विचारु लागले आहेत. याचविषयी जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC Commissioner) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढणार की नाही या […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. अशावेळी मुंबईतील लॉकडाऊन (Mumbai Lockdown) शिथील होणार का? असा प्रश्न अनेक जण विचारु लागले आहेत. याचविषयी जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC Commissioner) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढणार की नाही या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वाचा मुंबई आयुक्तांची ही विशेष मुलाखत.
प्रश्न: मुंबईची परिस्थिती आता खरोखरच सुधारत आहे का?
आयुक्त इकबाल चहल: दुसरी लाट आपल्याकडे 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली. याला आता साधारण 78 दिवस झाले आहेत. या 78 दिवसापासून आपण संघर्ष करत आहोत. या दिवसात आपल्याकडे 3 लाख 18 हजार नवे कोरोना रुग्ण सापडले. या काळात 1453 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण जर आपण टक्केवारी पाहिली तर आपल्या इथला मृत्यूदर हा 0.4 टक्के एवढाच आहे.
1 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान आपण 11 लाख 91 हजार टेस्टिंग केली. याचा अर्थ आपण दररोज सरासरी 44 हजारांच्यावर टेस्टिंग करत आहोत. टेस्टिंग कमी नाही हे लक्षात घ्या. जर टेस्टिंग झाल्या नसत्या तर रुग्णालयातील गर्दी वाढली असती.










