आमदार शिफारसीच्या ‘बोगस पत्रा’चा बॉम्ब; राज्यात खळबळ, राजभवनाला करावा लागला खुलासा

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. त्याची शहानिशा न करता टीव्ही माध्यमांनी बातमी चालवून टाकली. महाराष्ट्रात या पत्रामुळे एकच खळबळ माजली. ही खळबळ इतकी वाढली की राजभवनाला पुढे येऊन खुलासा करावा लागला आणि सांगावं लागलं की ते पत्र बनावट आहे. वाचा नेमकं काय घडलं? काही वेळापूर्वीच एक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. त्याची शहानिशा न करता टीव्ही माध्यमांनी बातमी चालवून टाकली. महाराष्ट्रात या पत्रामुळे एकच खळबळ माजली. ही खळबळ इतकी वाढली की राजभवनाला पुढे येऊन खुलासा करावा लागला आणि सांगावं लागलं की ते पत्र बनावट आहे.

वाचा नेमकं काय घडलं?

काही वेळापूर्वीच एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. हे पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी लिहिल्याचं यात दिसतं आहे. त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे की महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी सहा नावं सुचवल्याचा उल्लेख आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp