शिंदे गट, कलानी अन् इदनानी एकत्र लढले; तरी ठरले अपयशी, उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत यंदा अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. एकूण 78 जागांच्या या महापालिकेत बहुमताचा आकडा 40 आहे. भाजपने प्रथमच 37 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. मात्र सत्तेवर दावा करण्यासाठी अजून काही जागांची गरज आहे.

ADVERTISEMENT

Ulhasnagar Municipal Corporation
Ulhasnagar Municipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

point

शिंदे आणि कलानी गठबंधन ठरले अपयशी 

point

स्टार प्रचारकांशिवाय भाजपला घवघवीत यश

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत यंदा अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. एकूण 78 जागांच्या या महापालिकेत बहुमताचा आकडा 40 आहे. भाजपने प्रथमच 37 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. मात्र सत्तेवर दावा करण्यासाठी अजून काही जागांची गरज आहे. दुसरीकडे शिवसेना, स्थानिक पक्ष टीम ओमी कलानी (TOK), जीवन इदनानी यांची SAI पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या आघाडीने 36 जागा मिळवल्या. दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे ही संख्या 38 वर पोहोचली असली, तरीही ही आघाडी बहुमतापासून दोन जागा दूरच राहिली आहे. वंचित बहुजन आघाडीने 2 जागा जिंकल्या असून तिची सहयोगी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपने कसा हिसकावला?

शिंदे आणि कलानी गठबंधन ठरले अपयशी 

उल्हासनगरचे राजकारण दीर्घकाळ टीम ओमी कलानी आणि पप्पू कलानी यांच्या प्रभावाखाली राहिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सत्ता शिवसेना, भाजप आणि SAI पार्टी यांच्यात विभागली गेली होती. भाजपने कलानी कुटुंबाच्या पाठिंब्याने अडीच वर्षे स्वतंत्रपणेही महापालिकेची सत्ता सांभाळली होती. या निवडणुकीत शिवसेनेने आपल्या महायुतीतील भागीदार भाजपपासून वेगळी वाट निवडली. पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी TOK, RPI आणि SAI पार्टीसोबत आघाडी केली. मात्र मोठे दिग्गज आणि प्रभावशाली स्थानिक नेते असूनही सेना-नेतृत्वाखालील आघाडीला बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. 

स्टार प्रचारकांशिवाय भाजपला घवघवीत यश

भाजपसाठीही ही निवडणूक आव्हानात्मक ठरली. वरिष्ठ नेते मुंबईपुरते मर्यादित राहिले. मुख्यमंत्री यांच्या एका सभेव्यतिरिक्त मोठ्या स्टार प्रचारकांचा अभाव जाणवला. तरीसुद्धा स्थानिक नेतृत्व, अनुभवी चेहरे तसेच नवे, सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांच्या जोरावर भाजपने 2017 च्या तुलनेत चांगली कामगिरी करत प्रथमच मोठ्या संख्येने जागा मिळवल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 2017 मध्ये भाजप+ ला 32 तर शिवसेनेला 25 जागा मिळाल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp