PM Modi: ‘श्रमिकांना मोफत तिकिटं देऊन, मुंबईतून मूळ गावी पाठवून काँग्रेसने कोरोना पसरवला’, PM मोदींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला लोकसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी (Corona first wave) कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप करत तुफान टीकाही केली. ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील श्रमिकांनी मुंबई सोडून […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला लोकसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी (Corona first wave) कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप करत तुफान टीकाही केली.
‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील श्रमिकांनी मुंबई सोडून जावी यासाठी काँग्रेसने तिथे फुकट रेल्वेची तिकटं वाटली. काँग्रेसच्या या कृत्यामुळेच उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसने हातपाय पसरले.’ असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर केला आहे.
पाहा पंतप्रधान मोदी काय-काय म्हणाले;
‘काँग्रेसने तर हद्दच केली…’