भाजपसोबत युती करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पाताळात गेली पातळी..’
मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरीही राजकारणात कधीही काहीही शक्य आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार का? हा सवाल अनेक जण वारंवार विचारतात. मात्र, आता याच प्रश्नाबाबत स्वत: उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संपादक गिरीश कुबेर […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरीही राजकारणात कधीही काहीही शक्य आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार का? हा सवाल अनेक जण वारंवार विचारतात. मात्र, आता याच प्रश्नाबाबत स्वत: उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संपादक गिरीश कुबेर यांनी याचबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी याबाबत सविस्तरपणे उत्तर दिलं. तसंच भाजपला टोमणेही लगावले.
युतीबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘सर्वात आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत ते सुधारणार आहेत का?’ असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट निशाणा साधला.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले: