Nipah Virus : निपाह विषाणूचा संसर्ग कसा होतो? लागण झाल्यास उपाय काय? समजून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात आणि राज्याच्या उंबरठ्यावर कोरोनाची तिसरी लाट धडका मारण्यास सुरुवात झालेली असताना केरळातून चिंतेत भर टाकणारी बातमी आली. केरळमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसने मृत्यू झाला. केरळमध्ये आणखी काही रुग्ण आढळून आले आहेत.

केरळातील निपाह व्हायरसच्या संसर्गानंतर इतर राज्येही सतर्क झाली आहेत. लोकांनाही याबद्दल वेगवेगळे प्रश्न पडताना दिसत आहेत. तर जाणून घेऊया निपाह व्हायरसबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी…

निपाहचा व्हायरस कुठे आढळला?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे माणूस आणि प्राणी अशा दोघांनाही गंभीर स्वरुपाचे आजार होऊ शकतात. सर्वप्रथम निपाह व्हायरस सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता. त्यानंतर हळूहळू संपूर्ण जगभरात निपाहचा प्रसार झाला. वाटवाघळामधून या व्हायरसचा प्रसार होतो.

निपाह व्हायरसचा संसर्ग कसा होता?

ADVERTISEMENT

निपाह व्हायरसच्या प्रसाराचं मूळ वटवाघूळ आहेत. नैसर्गिक वाहक असल्यानं वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर निपाहचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यासही संसर्ग होऊ शकतो.

ADVERTISEMENT

निपाहचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातूनही हा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. डोळे, नाक, तोंडाद्वारे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

निपाह झाल्यानंतर कोणती लक्षणं जाणवतात?

ताप येणं, अंगदुखीचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होणं, डोकेदुखी, छातीत जळजळणं, चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, प्रकाशाची भीती वाटणं अशा स्वरुपाची लक्षणं निपाहची आहेत.

निपाहवर उपचार आहेत का?

या विषाणूमुळं होणाऱ्या संसर्गावर कोणतेही निश्चित असे म्हणजे ताप आल्यावर वा इतर आजार झाल्यावर केले जातात तशी उपचार पद्धती नाही. या आजारावर अद्याप औषधी व लस उपलब्ध झालेली नाही.

‘निपाह’ विषाणूचा ‘स्वाइन फ्लू’सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र ‘स्वाइन फ्लू’च्या तुलनेत ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र अधिक आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली जाते.

निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्याचं लक्षात आल्यानंतर रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येतात. या विषाणूमुळे होणाऱ्या आजार टाळण्यासाठी कोणतीही लस नाही. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ ते १४ दिवस असतो.

महत्त्वाचं म्हणजे…

निपाह व्हायरसचा एका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये प्रतिपिंडे (अॅन्टीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो, असं समज करून घेण्याची गरज नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT