समीर वानखेडेंच्या बदनामीसाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली-क्रांती रेडकर

मुंबई तक

समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली असा दावा करत क्रांती रेडकरने एक ट्विट केलं आहे. तसंच या ट्विटमधून तिने नवाब मलिक यांना टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर धाड टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली असा दावा करत क्रांती रेडकरने एक ट्विट केलं आहे. तसंच या ट्विटमधून तिने नवाब मलिक यांना टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर धाड टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांनी हा सगळा बनाव रचल्याचं म्हटलं होतं.

6 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत रोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत. त्यानंतर आजही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवाब मलिक यांनी पहिल्या बायकोला धमकावलं होतं तसंच तिच्या चुलत भावाला ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवलं होता असा आरोप केला आहे. दरम्यान नवाब मलिक यांना समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली आहे क्रांती रेडकर?

समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती शेअर केली. एक चूक झाली होती. नंतर त्याची रीतसर दुरुस्ती ज्ञानदेव वानखेडेंनी १९८९ मध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे स्वीकारली आणि पडताळली आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp