UPSC : IIT मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमारने सांगितला ‘यूपीएससी’तील यशाचा मंत्र; विशेष मुलाखत
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मूळचा बिहारचा आणि आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. शुभम कुमार सध्या पुण्यात प्रक्षिक्षण घेत असून, पंकज खेळकर यांनी शुभम कुमारसोबत संवाद साधला. प्रश्न – देशात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर कसं वाटतंय? प्रवास कसा होता? शुभम कुमार […]
ADVERTISEMENT

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मूळचा बिहारचा आणि आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. शुभम कुमार सध्या पुण्यात प्रक्षिक्षण घेत असून, पंकज खेळकर यांनी शुभम कुमारसोबत संवाद साधला.
प्रश्न – देशात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर कसं वाटतंय? प्रवास कसा होता?
शुभम कुमार – खूप चांगलं वाटतंय. देशात पहिला येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. मी २०१८ पासून परीक्षेची तयारी सुरू केली होती. तयारी करत असताना अनेक चढउतार आले. पण मी स्वतःला नशीबवान समजतो की कुटुंबांचा खूप आधार मिळाला. त्याचबरोबर मला चांगले मित्र मिळाले, ज्यंनी मला सातत्यानं प्रोत्साहित केलं.
प्रश्न – कोरोना काळातील स्थिती कशी होती?