मुंबईची खबर: ठाणे मेट्रोबाबत मोठी अपडेट! आता केवळ 'इतकीच' स्थानके खुली होणार... नेमकं कारण काय?
ठाणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांऐवजी केवळ चार स्थानकेच खुली होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाणे मेट्रोबाबत मोठी अपडेट!

आता केवळ 'इतकीच' स्थानके खुली होणार...
Thane Metro: ठाणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांऐवजी केवळ चार स्थानकेच खुली होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या MSETCL कंपनीकडून वीजेच्या लाइन्ससाठी परवानगी मिळवण्यात विलंब होत असल्याची माहिती आहे. तरीसुद्धा, राज्य सरकारने ही सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे, सध्या पूर्ण झालेल्या चार स्थानकांदरम्यान या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत आणला जाईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने हे साध्य करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचं सांगितलं जात आहे.
एलिव्हेटेड मेट्रो-4 A आणि मेट्रो-4 चं बांधकाम
मेट्रो मार्गे ठाणे मुंबईला जोडण्यासाठी, घोडबंदर रोडवरील वडाळा मार्गे गायमुख-कासारवडवली ते मुलुंड-घाटकोपर पर्यंत एलिव्हेटेड मेट्रो-4 A आणि मेट्रो-4 चं बांधकाम सुरू आहे. या संयुक्त मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत दहा स्थानके प्रस्तावित होती. वाहतूक कोंडीमुळे, या मार्गावर रस्त्याने प्रवास करण्यास किमान एक तास लागतो. जर पहिल्या टप्प्यात या दहा स्थानकांसाठी ही लाईन सुरू करण्यात आली असती तर मुलुंडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप फायदा झाला असता.
हे ही वाचा: Govt Job: 7 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांनी मिळवा सरकारी बँकेत नोकरी! लवकरच करा अर्ज...
महापारेषण कंपनीची 220 केव्ही वीज लाईन
MMRDA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅनल्ससंदर्भात सुरू असलेल्या कामामुळे अद्याप केवळ चार स्थानके सुरू केली जात आहे. ठाण्यात पडघा-कळवा-कोलशेत ते बोरीवली पर्यंत महापारेषण कंपनीची 220 केव्ही वीज लाईन घोडबंदर रोडवरील गायमुख आणि कापूरबावडी स्थानकांदरम्यान पातलीपाडा जंक्शनवरून जाते. या एलिव्हेटेड मेट्रो लाइनच्या निर्मितीसाठी वीजेची लाइन आणखी उंच असणं आवश्यक होतं. यावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागल्यामुळे काम उशिरा सुरू झाले.
हे ही वाचा: सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून महिलांशी मैत्री... नंतर, प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले अन्...
खरं तर, पहिल्या टप्प्यात सुरू होणारी चार स्थानके रस्त्याने जास्तीत जास्त 20 मिनिटांच्या अंतरावरची आहेत. विविध सरकारी विभागांद्वारे चालवल्या जाणाऱ्या बस सेवा देखील त्या मार्गावर दररोज पाच ते सात मिनिटांच्या अंतराने.
नियमितपणे धावतात. त्यामुळे जर ही मेट्रो फक्त चार स्थानकांवर सुरू झाली तर त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.