Maharashtra Rain: पालघर, पुणे आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट, पावसामुळे आत्तापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये पावसाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. अशात आता पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात IMD ने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला गेला आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाची धुवाँधार हजेरी आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूरस्थिती आहे. या पावसात आत्तापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ हजारांहून जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम तसंच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाने सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांशी संपर्क ठेवला आहे. पूर स्थितीबाबत उपाय योजना प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF च्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात आत्तापर्यंत १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पालघरसह (Palghar) इतर ठिकाणी NDRF पथक तैनात

मुंबई, ठाणे, रायगड-महाड, रत्नागिरी-चिपळूण, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर पालघर, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली या ठिकाणी एनडीआरएफचं प्रत्येकी एक एक पथक तैनात करण्यात आलं आहे. तर गडचिरोलीत एसडीआरएफची २ पथकं तैनात कऱण्यात आलं आहे. तर नांदेड, नाशिक, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफचं प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आलं आहे.

पुणे आणि इतर भागातील परिसरात असलेले गड किल्ले तसंच पर्यटनाची स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. ३१ जुलैपर्यंत ही पर्यटन स्थळं आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले लोहगड, विसापूर यांसह महत्त्वाचे गड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर १४४ कलम लागू होणार आहे. या सह इतर पर्यटन स्थळं अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात १४४ लागू कलम लागू करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT