राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..: अजित पवार
मुंबई: ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. आपण खूप जणांनी त्या संदर्भातील अनुभव घेतला आहे.’ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केलं आहे. विधानपरिषदेचे 10 सदस्य येत्या काळात निवृत्त होणार आहे. याच सदस्यांबाबत अजित पवार बोलत होते. विधानपरिषदेतून […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. आपण खूप जणांनी त्या संदर्भातील अनुभव घेतला आहे.’ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केलं आहे. विधानपरिषदेचे 10 सदस्य येत्या काळात निवृत्त होणार आहे. याच सदस्यांबाबत अजित पवार बोलत होते.
विधानपरिषदेतून ज्या 10 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यांच्याच विषयी बोलताना अजित पवार यांनी काहीसे चिमटे देखील काढले.
पाहा सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘2014 साली स्वाभिमानी सघंटनेने भाजपसोबत युती केली शेवटच्या टप्प्यात स्वाभिमानीच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी निवड झाली. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांना संधी मिळाली. मात्र, या काळात सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी संघटनेचा हात सुटला आणि आता ते एकटेच पुढे चालले आहेत.’