बिहारमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत! नितीश कुमारांचा भाजपविरोधात पुढचा डाव काय?
रविवारी, ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत निती आयोगाची बैठक झाली. या बैठकीतील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीने बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जदयू आणि भाजप यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता असून, नितीश कुमार हे याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर आता नितीश कुमार यांचा पुढचा […]
ADVERTISEMENT

रविवारी, ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत निती आयोगाची बैठक झाली. या बैठकीतील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीने बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जदयू आणि भाजप यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता असून, नितीश कुमार हे याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर आता नितीश कुमार यांचा पुढचा डाव काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जदयूचं संख्याबळ घटलं. नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री बनले, मात्र भाजपकडून जदयू फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप सुरू झाले. अलिकडेच जदयूचा राजीनामा देणाऱ्या आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला.
जदयूने थेट सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जदयूचे आमदार मध्यावधी निवडणुकीसाठी तयार नाही. त्यातच नितीश कुमार यांनी केंद्राच्या एक दोन नव्हे तर तब्बल चार कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. त्यामुळे नितीश कुमार आता तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीश कुमार सोनिया गांधींच्या संपर्कात!
नितीश कुमारांनी भाजपच्या नेतृत्वापासून दुरावा ठेवला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क केल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील सुत्रांनी ‘आजतक’ला दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहे. आरसीपी सिंह यांनी जदयूचा राजीनामा दिल्यापासून नितीश कुमारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क सुरू केला.