लखीमपूर हिंसाचार : माझा मुलगा घटनास्थळी नव्हताच – केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनींचं स्पष्टीकरण

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकारानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या मुलाचा बचाव केला आहे. आपला मुलगा घटनास्थळी हजरच नव्हता, तो उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रम स्थळी असल्याचा दावा टेनी यांनी केला आहे. यावेळी बोलत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकारानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या मुलाचा बचाव केला आहे.

आपला मुलगा घटनास्थळी हजरच नव्हता, तो उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रम स्थळी असल्याचा दावा टेनी यांनी केला आहे.

यावेळी बोलत असताना अजय मिश्रा टेनी यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी काही असमाजिक व्यक्तींनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप टेनी यांनी केला आहे. या दगडफेकीमुळे ताफ्यातली एक गाडी पलटल्याचं टेनी यांनी सांगितलं आहे. इतकच नव्हे तर आंदोलनात सहभागी काही असमाजिक तत्वांनी भाजपच्या ३-४ कार्यकर्त्यांना मारपीट करुन हत्या केली आहे.

लखीमपूर हिंसा : मृतांचा आकडा आठ वर,
केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp