मुंबईत पुन्हा Lockdown लागणार का? पालकमंत्र्यांनी दिलं हे उत्तर
महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबईत लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्नही विचारला जातो आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती नेमकं काय म्हणाले आहेत अस्लम शेख? मुंबईत लॉकडाऊनची आवश्यकता भासली तर लॉकडाऊन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबईत लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्नही विचारला जातो आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती
नेमकं काय म्हणाले आहेत अस्लम शेख?
मुंबईत लॉकडाऊनची आवश्यकता भासली तर लॉकडाऊन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातला अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. इतर ठिकाणीही वाढत आहेत. अशात नाईट क्लब सर्वात आधी बंद करण्यात येतील अशी शक्यता आहे. अधिवेशन झाल्यानंतर मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी या ठिकाणी रात्री जी विनाकारण गर्दी होते तिथे बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल. नाईट कर्फ्यू लावायचा की लॉकडाऊन करायचा याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.