Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ! जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
-प्रतिनिधी, रत्नागिरी/रायगड मोठी दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस परतला. गेल्या २४ तासांपासून राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू असून, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातीलही काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. माणगाव खोराला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. या भागातील उपवडे, शिवापूर,आंजिवडे, […]
ADVERTISEMENT

-प्रतिनिधी, रत्नागिरी/रायगड
मोठी दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस परतला. गेल्या २४ तासांपासून राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू असून, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातीलही काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
माणगाव खोराला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. या भागातील उपवडे, शिवापूर,आंजिवडे, दुकानवड, हळदीचे नेहरू, वसोली, शिवापूर, पुळास, वाडोस, महादेवाचे किरवडे आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.