निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आवाहन

मुंबई तक

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं असून, आता कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याबद्दल भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं असून, सोमवापर्यंत कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं म्हटलं आहे. काय म्हणाले आहेत अनिल परब? विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आता तातडीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं असून, आता कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याबद्दल भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं असून, सोमवापर्यंत कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत अनिल परब?

विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आता तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तसंच संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे ते कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता यावर संपकरी काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp