रायगडमध्ये AK47 रायफल्ससह सापडलेली बोट कोठून आली?; बोटीचं ऑस्ट्रेलियाशी काय कनेक्शन?

मुंबई तक

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या हरिहरेश्वर येथील समुद्रात एक बोट (यॉट) आढळून आल्यानं राज्यासह देशभरातील यंत्रणा सतर्क झाल्या. समुद्रात आढळून आलेल्या या बोटीत एके ४७ रायफल्स आणि त्यांचा दारुगोळा आढळून आला. त्यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनासह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ही घटना समोर आली. त्यामुळे विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी याकडे लक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या हरिहरेश्वर येथील समुद्रात एक बोट (यॉट) आढळून आल्यानं राज्यासह देशभरातील यंत्रणा सतर्क झाल्या. समुद्रात आढळून आलेल्या या बोटीत एके ४७ रायफल्स आणि त्यांचा दारुगोळा आढळून आला. त्यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनासह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या.

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ही घटना समोर आली. त्यामुळे विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी याकडे लक्ष वेधलं. त्यावर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दलची सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन केलं.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबद्दलची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “१८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हद्दीत हरिहरेश्वर येथील समुद्री किनाऱ्यावर १६ मिटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या बोटीची तपासणी केली. त्यात तीन एके ४७ रायफल्स आणि रायफल्ससाठी लागणारा दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली.”

“ही घटना समोर आल्यानंतर तातडीने किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाला आणि इतर संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp