कल्याण: आधी पंढरपूर नंतर आधरवाडी… जेलमधून पसार झालेला भामटा ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई तक

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस देखील अधिक सतर्क झाले असून गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी ताबडतोब कारवाई करत असल्याचं दिसून येत. अशाच एका कारवाईत तब्बल दोन वेळा तुरुंगातून पळून गेलेला एका भामटा चोर कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश गायकवाड नावाचा हा चोरटा जेलमधून तब्बल दोनदा पळून गेल्याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस देखील अधिक सतर्क झाले असून गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी ताबडतोब कारवाई करत असल्याचं दिसून येत. अशाच एका कारवाईत तब्बल दोन वेळा तुरुंगातून पळून गेलेला एका भामटा चोर कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश गायकवाड नावाचा हा चोरटा जेलमधून तब्बल दोनदा पळून गेल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने अनेक लुटीचे गुन्हे केल्याची माहिती देखील आता उजेडात आली आहे. त्याने चोरलेले पाच महागडे मोबाइलही यावेळी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

दोनदा तुरुंगातून पळून गेलेला चोर नेमका कसा सापडला?

कल्याणमध्ये राहणारे मनिष गुप्ता यांची आई त्यांच्या मूळ गावी आझमगडला जाण्यासाठी निघाली होती. 22 डिसेंबर रोजी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसने उत्तर प्रदेशला रवाना होणार होती. मुलगा मनिष आईला घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात आला. मात्र, गाडी स्थानकात येण्यास वेळ होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp