परमबीर सिंग यांना विदेशात पळून जाण्यासाठी मोदी सरकारने मदत केली-नाना पटोले

मुंबई तक

मुंबईचे माजी मोदी सरकारने मदत केली आहे असा आरोप आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादाने परमबीर सिंग परदेशात पळून गेले. ज्या दिवशी अनिल देशमुख यांना अटक केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंग यांच्या वकिलांच्या मार्फत कोर्टात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आणि त्यात हे सांगण्यात आलं की आमच्याकडे अनिल देशमुखांच्या विरोधात काहीही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईचे माजी मोदी सरकारने मदत केली आहे असा आरोप आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादाने परमबीर सिंग परदेशात पळून गेले. ज्या दिवशी अनिल देशमुख यांना अटक केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंग यांच्या वकिलांच्या मार्फत कोर्टात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आणि त्यात हे सांगण्यात आलं की आमच्याकडे अनिल देशमुखांच्या विरोधात काहीही पुरावे नाहीत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोडलं तर त्यांच्याकडे आरोप सिद्ध करायला काहीही नाही. त्यामुळेच मोदी सरकारने त्यांना पळून जाण्यास मदत केली असा आरोप आता नाना पटोलेंनी केला आहे.

खोटे आरोप लावायचे आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हा भाजपचा डाव आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. जर मोदी सरकारला लोकांना जेलमध्ये पाठवण्याची हौस असेल तर आता आम्ही सगळे काँग्रेसवाले तुरूंगात जायला तयार आहोत असंही प्रतिपादन नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं.

अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत, जाणून घ्या कसं समोर आलं वास्तव?

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

    follow whatsapp