भाजपचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडपत आहेत, नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप
भाजप राजकारण करताना प्रभू रामचंद्रांचं नाव घेतं. मात्र याच पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडप करत आहेत असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसंच या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला. या आरोपांनी खळबळ उडाली आहे आता भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार […]
ADVERTISEMENT

भाजप राजकारण करताना प्रभू रामचंद्रांचं नाव घेतं. मात्र याच पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या नावे असलेली जागा हडप करत आहेत असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसंच या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला. या आरोपांनी खळबळ उडाली आहे आता भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं… नवाब मलिक यांचा टोला
नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?
‘जो भारतीय जनता पक्ष रामाच्या नावाने राजकारण करतो, त्या पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या देवस्थानची जागा हडप करत आहेत. विठोबाच्या नावे असलेली देवस्थानची जागा हडपत आहेत. सात मंदिरांच्या माध्यमातून जागा हडप करून हजारो कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. ईडीसारखी संस्था ज्यावर कुणीही अविश्वास दाखवत नाही. ती संस्था या दहा देवस्थानांच्या जमिनीच्या हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. ईडीने आता या प्रकरणी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जी मुस्लिम किंवा इतर धर्माच्या नावाने देवस्थान असेल ती जागा हडपण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे ती थांबावी म्हणून आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे.’