हिंदूंना ज्या भावात गॅस-पेट्रोल मिळतं, त्याच भावात मुस्लिमांना मिळतं -नितीन गडकरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं लोकार्पण आणि कोनशिला समारंभ पार पडला. राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्दे अधोरेखित केले. गरिबी आणि धर्मातील भेदांवरही गडकरी यांनी यावेळी भाष्य केलं.

अहमदनगर जिल्ह्यात 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार सुजय विखे-पाटील यांना मिश्किल टोला लगावला.

“खासदार विखेंनी सांगितलं की, सगळ्यात जास्त निधी अहमदनगर जिल्ह्याला मिळाला. त्यांनी हे उद्गार काढले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण, मी ज्या-ज्या जिल्ह्यात जातो, त्या-त्या जिल्ह्यातील खासदार हेच म्हणत असतो. ज्या राज्यात जातो, त्या राज्यातील मुख्यमंत्री म्हणतो की आम्हाला जास्त निधी मिळाला, असं म्हणत असतो’, असं म्हणताच व्यासपीठावरील मान्यवरांवर उपस्थितामध्ये हस्या पिकला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘खरंतर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. हा विकास करण्यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, रस्ते आणि संवाद सुविधा! आपल्या देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू होण्याआधी उद्योजक विचार करतो की, या चार गोष्टी आहेत की नाही. जर या गोष्टी असेल, तर तिथे उद्योग आणतो. उद्योग आला तर स्वाभाविकपणे भांडवली गुंतवणूक येते आणि भांडवली गुंतवणूक आली, तर रोजगार निर्माण होतो’, असं गडकरी म्हणाले.

‘गरीब गरीब असतो. गरीबाला जात, धर्म, भाषा नसते. गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेल ज्या भावात हिंदूंना मिळतं, त्याच भावात मुस्लिमांनाही मिळतं. त्यामुळे या देशातील गरीबी, उपासमार, आणि बेरोजगारी दूर करणं गरजेचं आहे. गाव, गरीब आणि मजुरांचं कल्याण करायचं असेल, तर रोजगाराची निर्मिती केली पाहिजे आणि रोजगाराची निर्मिती करायची असेल, पाणी, वीज, रस्ते आणि संवाद सुविधा असाव्या लागतील’, असं गडकरी म्हणाले.याच

ADVERTISEMENT

दुध उत्पादनाबद्दलचा सांगितला किस्सा…

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी दूध उत्पादनाबद्दलचा किस्सा सांगितला. ‘राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरीच्या मीटिंगला एकदा आले. त्यावेळी मी ‘आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल? असा प्रश्न मदर डेअरीचे चेअरमन व भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना विचारला होता.

त्याचवेली मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला की, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध उत्पादन होतं. तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही. याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी संपन्न झाला पाहिजे, समृद्ध झाला, असं वाटतं, असंही गडकरी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT