आता कंपन्यांना द्यावे लागणार 6 एअरबॅग्स; कधीपासून होणार नियम लागू, नितीन गडकरींनी तारीख सांगितली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारमधील एअरबॅग्सबाबत मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपन्यांना आता कारमध्ये किमान सहा एअरबॅग्ज (6 एअरबॅग) द्याव्या लागतील. नितीन गडकरी यांनी 1 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली.

ट्विट करून माहिती शेअर केली

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे ही माहिती शेअर करताना सांगितले की, 1 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये 6 एअरबॅग आवश्यक असतील. एअरबॅग्जबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते, अशी अटकळ आधीच वर्तवली जात होती. परंतु, ती निश्चित मुदतीपेक्षा वाढविण्यात आली आहे. गडकरींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोटार वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे, किंमत आणि प्रकार काहीही असो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी आपल्या ट्विटमध्ये ऑटो उद्योगासमोरील जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांचाही उल्लेख केला. पुरवठा साखळीतील अडचणी लक्षात घेऊन या प्रस्तावासाठी पुढील वर्षाची ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन वेबसाइटनुसार, एम-1 श्रेणीतील कार अशा आहेत ज्यात चालकाच्या सीटसह एकूण 8 जागा आहेत.

कार उत्पादकांना सुनावलं

ADVERTISEMENT

आता दुटप्पी वृत्ती चालणार नाही, असे नितीन गडकरी यांनी यापूर्वी वाहनधारकांना सुनावले होते. एक मोठा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, देशातील कार उत्पादक कंपन्या दुटप्पी वृत्ती बाळगत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या भारतातून 6 एअरबॅग असलेली वाहने निर्यात करत आहेत, पण जेव्हा हीच वाहने भारतात विकली जातात तेव्हा त्यांना फक्त दोन किंवा चार एअरबॅग दिल्या जातात. एअरबॅग्सच्या वाढीमुळे गाड्यांच्या किमतीत मोठी झेप घेतली जाणार नाही आणि रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मानक आणि नियमांशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे गडकरी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

फक्त काही कारमध्ये 6 एअरबॅग एअरबॅग

कारमधील सर्वात महत्त्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य मानले जाते. परंतु, वाहन उत्पादक केवळ काही महागड्या कारमध्ये 6 एअरबॅग देतात. अशा कारची अंदाजे संख्या देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या एकूण कारच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या घोषणेनंतर रस्त्यांवर 6 एअरबॅग असलेल्या कारच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.

जीव वाचवण्यासाठी एअरबॅग्ज महत्वाच्या

अपघाताच्या वेळी कारमधील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एअरबॅग खूप उपयुक्त ठरतात. भारतातील रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत असल्याने हे देखील महत्त्वाचे ठरते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील एका कार्यक्रमात ही आकडेवारी मांडताना सांगितले होते की, देशात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात. त्यांनी सांगितले होते की रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोकांचा जीव जातो, तर सुमारे 3 लाख लोक जखमी होतात. अलीकडेच, टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर मोटारींच्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबाबतची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT