पुणे : पतीच्या त्रासामुळे मुलीसह संपवलं होतं आयुष्य; 29 वर्षांनंतर उच्च न्यायालयात मिळाला न्याय

विद्या

पती आणि सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका महिलेनं मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अखेर 29 वर्षांनंतर महिलेला न्याय मिळाला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पती आणि सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका महिलेनं मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अखेर 29 वर्षांनंतर महिलेला न्याय मिळाला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तर आरोपीसोबत राहणाऱ्या भारती नावाच्या महिलेला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

मूळ घटना काय?

मुलीसह आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव जनाबाई आहे. जनाबाई यांचा रामदास धोंडू कलाटकर यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन्ही मुली झाल्या. पहिल्या मुलीचं अचानक निधन झालं. त्यांनंतर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जनाबाई काही दिवसांसाठी आईवडिलांकडे माहेरी गेल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp