संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादमध्ये केली नुकसानीची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंबई तक

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट मदत दिली पाहिजे त्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायला हवी, पहिली जबाबदारी राज्याकडून अपेक्षित , केंद्र सरकारकडे मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मागणी करून गरीब शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उस्मानाबादमध्ये केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद

सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट मदत दिली पाहिजे त्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायला हवी, पहिली जबाबदारी राज्याकडून अपेक्षित , केंद्र सरकारकडे मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मागणी करून गरीब शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उस्मानाबादमध्ये केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भर पावसात उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी येथे अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp