विलीनीकरणाची मागणी रास्तच ! ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता शिवसेना आमदाराचाही पाठींबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. हा संप मोडण्यासाठी राज्य सरकारने आधी कारवाईचा बडगा आणि नंतर पगारवाढीची घोषणा करत अनेक प्रयत्न केले. परंतू अजुनही राज्यातली एसटी सेवा हे बंदच आहे. संपकरी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यामुळे यावर तोडगा निघत नाहीये. एकीकडे परिवहन मंत्री अनिल परब एसटीचं विलीनीकरण होणं शक्य नसल्याचं सांगत कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन करत असताना आता शिवसेना आमदारानेच या आंदोलनाला पाठींबा देत आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी योग्यच असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार बांगर यांनी आपल्या पत्रात, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण व्हावं यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी रास्त असून वाढती महागाई आणि तुटपुंजा पगार यातून ६३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने परिवहन मंडळाचं विलीनीकरण करुन घ्यावं अशी विनंती केली आहे.

कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे दुसरीकडे सरकारनेही आता कडक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे. कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस पाठवण्यापासून ते थेट निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा कामावर रुजु करुन घेण्याचा राज्य शासनाचा विचार सुरु असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी संपाचा तिढा आता नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT