ऑक्सिजनचा टँकर वेळेत पोहचलाच नाही, 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई तक

तिरुपती: आंध्रप्रदेशच्या तिरुपतीमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर योग्य वेळेत न पोहचल्याने तब्बल 11 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुपतीचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मृतांचा हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तिरुपती: आंध्रप्रदेशच्या तिरुपतीमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर योग्य वेळेत न पोहचल्याने तब्बल 11 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुपतीचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मृतांचा हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑक्सिजन टँकर हा रुग्णालयात वेळेवर पोहचू शकला नाही आणि त्याचवेळी रुग्णालयातील ऑक्सिजन देखील संपल्याने रुग्णांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. या रुग्णालयात एकूण 135 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते.

‘माझी आई तडफडून मेली, अख्ख्या वॉर्डमधील सगळे पेशंट संपले’, नातेवाईकांचा आक्रोश

हे वाचलं का?

    follow whatsapp